

सरकारी वकीलही आता भाजपचेच राहणार काय ? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर नाना पटोलेंचा सवाल…
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ऍड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर लगेचच भाजपने त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला असून ‘आता सरकारी वकील ही भाजपचेच राहणार’ हेच भाजपने सिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा ही…

कामराज निकम यांच्यावरील खोट्या गुन्ह्याचा तीव्र निषेध
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश चिटणीस कामराज निकम तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल करण्यात आलेली सर्व फिर्याद पूर्णपणे खोटी, बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो, प्रशासनाने वस्तुनिष्ठ तपास करून कार्यवाही करावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणे बंद करून राजकीय हेतूने होणारा प्रशासनाचा…

धुळे जिल्ह्यात क्रीडा प्रशिक्षकांची पदे तात्काळ भरा – अॅड. पंकज गोरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
धुळे जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी रिक्त असलेल्या प्रशिक्षकांच्या जागा तात्काळ भराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना महाराष्ट्राचे सहसचिव अॅड. पंकज गोरे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते…

हायवेवर साचलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन सादर
धुळे देवपूर प्रभाग क्र. 2 मधील ओमशिवम नगर, भगवती कॉलनी आणि पांडव नगर परिसरातील नागरिकांना मागील काही काळापासून हायवेवर साचलेल्या गढूळ पाण्यामुळे गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हितेश अग्रवाल यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. बीबीसी हॉटेलजवळील हायवेवरील मोरी ही पाण्याने पूर्णपणे भरून…

धुळ्याच्या नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पदभार स्वीकारला
धुळेच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज २७ मे रोजी स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी आज दुपारी धुळे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी (धुळे) रोहन…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महिलामेळावा संपन्न
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धुळे येथे भारतीय जनता पक्ष महिला आघाडी व कामगार आघाडीच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात भांडी वाटप करण्यात आले, तर सामाजिक एकात्मता आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले…

मासे कुत्र्याने खाल्ले म्हणून संताप, मुलाकडून वृद्ध आईची लाकडी दांडक्याने हत्या
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील वाठोडे शिवारात घडली घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वाठोडे गावाच्या ताजपुरी शिवारामध्ये किरकोळ कारणावरून 67 वर्षीय आईची तिच्याच मुलाकडून लाकडी दांडक्याने अमानुष हत्या करण्यात आली. मृत महिलेचे नाव टिपाबाई रेबला पावरा असून त्या मूळच्या खैरकुटी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील रहिवासी होत्या….

बनावट बियाणे विक्री करणारी टोळी गजाआड; कृषि विभाग व निजामपूर पोलिसांची संयुक्त कारवाई
निजामपूर परिसरात बनावट कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर कृषी विभाग आणि निजामपूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई गुप्त बातमीच्या आधारे आखाडे फाट्याजवळ करण्यात आली. बनावट बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने धाडसी निर्णय घेत शेतकरीहितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कृषी विभागाचे बियाणे निरीक्षक अरुण तायडे आणि…

महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राच्या सल्लागार समिती सदस्यपदी डॉ. गोविंद पोद्दार व राहुल पोद्दार यांची,तर सचिवपदी डॉ.संजय ढोडरे यांची नियुक्ती
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्राच्या स्थानिक सल्लागार समितीवर प्रा. डॉ. गोविंद पोद्दार आणि राहुल पोद्दार यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून, सचिवपदाची जबाबदारी कार्यकारी संचालक प्रा. डॉ. संजय ढोडरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही नियुक्ती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे…

धुळ्यातील पाणीयोजना व सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारकडून भरघोस निधी मंजूर- खा.डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रयत्नांना यश
धुळे जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचन प्रकल्पांना लवकरच नवसंजीवनी मिळणार आहे. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय जलशक्ती मंत्री नाम. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तापी जलवाहिनी, अक्कलपाडा योजना (भाग २) आणि प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना यांना भरघोस निधीची मंजुरी देण्यात…

साक्री तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू पास वितरणास सुरुवात
महाराष्ट्र शासनाच्या वाळू धोरण २०२५ आणि महसूल व वन विभागाच्या २० एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार, साक्री तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरपोच वाळू पास वाटप करण्याची महत्त्वपूर्ण योजना आज प्रत्यक्षात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या या निर्णयानुसार, घरकुल उभारणीसाठी पात्र लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू घरपोच मिळणार आहे….